Skip to main content

प्रश्न

।। प्रश्न ।।


तू जरा 

नाक फुगवून

रुसून बसते, 

उगाच, अकारण 

लपवून काही पुटपुटते.  

पौंगंडाचे लाडीक वेडे 

वय तुझे खरपूससे. 


मला वाटले 

गालावरच्या पुरळाचे 

किंवा काजळ पसरल्याचे 

असेल नीताचे गाऱ्हाणे. 


ती पुसते रागाने

पण निरागस लाजेने 

का दिले दैवाने स्त्रीस

हे स्तनाचे ओझे ? 


समानतेच्या शतका नंतर 

अजुन उरले हे कोडे ? 

मी पुरुषासम सक्षम 

मी नजरेने नभ मोजीते. 


मी म्हणालो - 

पुरुष तसा कोमलमन

स्त्री शक्ती त्याची,  

तो बुरुज उभारी परी 

तू  माती त्याची. 


ती म्हणाली 

समज नको उथळशी 

हे उत्तर नाही प्रश्नाचे 

गूढ कोणते छातीचे ? 


मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे 

हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने 


मी म्हणालो 

आईने व आजीने मला न कोणी सांगितले 

पण ऐक सांगतो 

ताऱ्यांच्या पलीकडचे 

कालाच्या उदयानंतरचे 

सृष्टीच्या सुरवातीचे 


सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने 

यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें 

हे तू ऐकिले असावे, तेव्हाचे 


एका सुवर्ण मृगाने 

वर घेतला सुज्ञेने 

मज कस्तुरीची गाठ हवी 

विसराया देहभान प्रज्ञेने 


स्त्रीही होती तिथे 

तिने कर केले पुढे 

ईशाने ममत्वाचे 

कमळ तिला दिले 


म्हणाला निर्मितेचे 

सारे अंकुर आता उगवू दे 

पोषणाने तुझ्या 

देहास चैतन्य कळू दे. 


हे ममत्व तुझे झटू दे प्राण 

सोहमाच्या यज्ञाचे दान 


तुज कोमल वक्षे देतो 

सुसश्रूषा तू करावी 

तू आई होऊन 

पृथीची उध्दरणीच व्हावी 


हे तेज सांभाळ युगानू युगे

अनु रेणूतील शिवाचे लेणें 

तू मातृत्वाने जवळ मलाही घ्यावे 

ऋण माझेही हे तारण जन्मांचे उरलेले. 


पृथ्वीवरच्या पिढ्या पिढ्यानी पेलले 

का तुला वाटते स्तनाचेच ओझे ? 


ती म्हणाली 

पावित्र्य विसरुनी वासना 

भरती नजरा 

दैवत्वाची जाणीव 

मृत संवेदना. 


मी म्हणालो 

जिथे जिथे स्त्रियांनी 

ममतेची कस्तुरी जडली 

त्या गंधाने राष्ट्र निर्मिती घडली 


हे सत्व तुझे तूच सांभाळ प्रतिष्ठा

तेजपुंज उजळतो अश्यांच्याच गर्भा. 

चारित्र तुझे पवित्र उजळ सूर्यासम 

जळतील तुझे शत्रू सारे तृणांसम


गर्व असुदे तुझ्या स्त्रीत्वाचा 

छातीवरच्या सूर्यपुंज्याचा. 


 




 












Comments

Popular posts from this blog

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात. 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...